खगोलअभ्यास वेधशाळा
भारताची खगोलअभ्यास वेधशाळा- अॅस्ट्रोसॅट!
ब्रह्मांडातील वस्तूंचा वेध घेण्याची धडपड जगभरात सुरू आहे. यामध्ये भारतही मागे नाही.
ब्रह्मांडातील वस्तूंचा वेध घेण्याची धडपड जगभरात सुरू आहे. यामध्ये भारतही मागे नाही. सोमवारी भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) पहिला खगोलीय उपग्रह अवकाशात पाठविला आणिअंतराळविज्ञान क्षेत्रात नवी प्रगती केली. हा उपग्रह सोडणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. या यशानिमित्त सॉफ्ट एक्स-रे टेलिस्कोप विकसित करणाऱ्या टाटा मूलभूत विज्ञान संस्थेच्या चमूतीलविनीता नवलकर यांनी ‘अॅस्ट्रोसॅट’चा मांडलेला प्रवास.
आपल्यापासून जे लांब असते त्याची आपल्याला खूप उत्सुकता असते. तेथे घडणाऱ्याघडमोडींची माहिती आपल्याला व्हावी असे माणसाला वाटत असते. यातूनच विज्ञान आणि संशोधनाच्याशाखा विकसित होत गेल्या. खगोलशास्त्र हा तर पूर्णत: कुतूहल आणि नावीन्याने भरलेला विषय आहे. यातूनच माणूस चंद्र, मंगळ या ग्रहांपर्यंत पोहचू शकला. पण तरीही असे अनेक प्रश्न आहेत जे आजहीअनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जगातील विविध देश अंतराळ मोहिमांची आखणीकरतात. यातूनच भारताच्या ‘अॅस्ट्रोसॅट’चा जन्म झाला आणि या मोहिमेचा पहिला टप्पा सोमवारीयशस्वीही झाला.
अॅस्ट्रोसॅट हा भारताचा पहिला खगोलशास्त्रसाठी समर्पित उपग्रह आहे. या उपग्रहामुळेआपल्याला खगोलीय घटना व खगोलीय वस्तूंची सखोल माहिती मिळू शकणार आहे. या उपग्रहाचे ठळकवैशिष्टय़ म्हणजे एकाच उपग्रहाद्वारे, एकाच वेळी विद्युतचुंबकीय तरंगलहरींच्या एका रुंद पट्टय़ांचेनिरीक्षण करणे सहज, सोपे होणार आहे. दृश्य, अतिनील, मृदू आणि कठीण क्ष-किरण अशा विविधतरंगलहरींमध्ये आपण ब्रह्मांडातील वस्तूंचा वेध घेऊ शकतो. आतापर्यंत जगभरातून सोडण्यातआलेल्या अनेक दुर्बणिी पृथ्वीभोवती फिरत आहेत. पण त्या सर्वाची निरीक्षणक्षमता काही ठराविकतरंगलहरींपुरती मर्यादित आहे. या सर्वाच्या पुढे जाऊन भारताने ‘अॅस्ट्रोसॅट’ विकसित केला. म्हणूनचभारताची ही मोहीम नासापेक्षा एक पाऊल पुढे आहे, असे म्हटले जाते.
‘अॅस्ट्रोसॅट’ची संकल्पना १९९६ मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आली व २००० मध्ये त्याचा सखोल अहवाल‘इस्रो’कडे सादर केला गेला. हा अहवाल स्वीकारून २००२ मध्ये इस्रोने, प्राथमिक निधी उपलब्ध करूनदिला. तत्कालीन केंद्र सरकारने २००४ मध्ये या मोहिमेला अधिकृत मान्यता देऊन पुढील निधी प्रदानकेला. यानंतर पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर, भारतीय शास्त्रज्ञांच्या अतोनात मेहनतीने हा उपग्रह तयारझाला. त्यात भारतातल्या आघाडीच्या वैज्ञानिक संस्थांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये टाटा मूलभूतसंशोधन संथा (टीआयएफआर) मुंबई, इंटर युनिवर्सटिी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्डअॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) पुणे, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (आयआयए) बंगळुरू, रामन रिसर्च संस्था (आरआरआय) बंगळुरू आणि इस्रो या संस्थांचा समावेश आहे. या प्रकल्पाचेआणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अशा प्रकारचा उपग्रह पहिल्यांदाच बनवण्यात आला असल्यामुळे याउपग्रहावरची बहुतांश उपकरणे कोणत्याही पाश्चात्त्य तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता भारतातचविकसित केली गेली आहेत.
या उपग्रहावर पाच विविध उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यातील सर्वात पहिले आणि मध्यभागीअसलेले उपकरण म्हणजे ‘अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (यूव्हीआयटी). या दुर्बणिीचे दृष्टीक्षेत्र मोठेअसल्यामुळे एकाच वेळी अवकाशाच्या मोठय़ा भागाचे निरीक्षण करणे सहज शक्य होणार आहे. अवकाशातून येणाऱ्या दृश्य व अतिनील लहरींची छायाचित्रे घेण्याचे काम ही दुर्बीण करेल. याछायाचित्रांमधून, अशा लहरी उत्सर्जति करणाऱ्या खगोलीय वस्तूंचा अभ्यास आपल्याला करता येईल. ‘आयुका’ आणि ‘आयआयए’ने मिळून यूव्हीआयटी तयार केलेली आहे. त्यातील कॅमेरा सेन्सर, कॅनडास्पेस सेंटरने बनविले आहेत. या उपग्रहावरील तीन उपकरणे ‘टीआयएफआर’मध्ये तयार करण्यात आलीआहेत. डॉ. जे. एस. यादव व त्यांच्या चमूने ‘लार्ज एरिया प्रोपोर्शनल काउंटर’ (एलएएक्सपीसी) तयारकेला आहे. त्यात त्यांना ‘आरआरआय’ची मोलाची साथ लाभली.
एलएएक्सपीसीद्वारे आपल्याला क्ष-किरण उत्सर्जति करणारे जोड तारे व काही ठराविकआकाशगंगांच्या केंद्रांचा सखोल अभ्यास करता येणार आहे.
चंद्राची निर्मिती पृथ्वीची दुस-या ग्रहाशी टक्कर होऊन झाली
तंत्र - विज्ञानसर्वात लोकप्रिय
लॉस एंजल्स : पृथ्वी व निर्मितीच्या प्रारंभिक अवस्थेतील दुस-या एका ग्रहाची समोरासमोरटक्कर होऊन चंद्राची निर्मिती झाली असल्याचे नवीन अभ्यासात दिसून आले. पृथ्वी त्या ग्रहावर जाऊनआदळली हा आधीचा समज त्यामुळे योग्य नाही. पृथ्वीच्या निर्मितीनंतर १० कोटी वर्षांनंतर थिया हाबाल्यावस्थेतील ग्रह तिच्यावर आदळला होता.
वैज्ञानिकांनी सांगितले की, हा ग्रह पृथ्वीवर आदळला होता व तो आघात ४.५ अब्ज वर्षांपूर्वीझाला होता हे याआधीच माहिती आहे, पण पृथ्वी थिया या ग्रहावर ४५ अंशाच्या कोनातून आदळली असेजे मानले जाते ते चुकीचे आहे. उलट हा ग्रहच पृथ्वीवर आदळला होता. समोरासमोर टकरीचा चंद्रनिर्मितीचा सिद्धांत त्यामुळे खरा असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. लॉसएंजल्समधील कॅलिफोर्नियाविद्यापीठातील वैज्ञानिकांनी चंद्रावर गेलेल्या अपोलो १२, १५ व १७ मोहीमांतील जे खडक पृथ्वीवर आणलेआहेत त्यांचा अभ्यास केला. शिवाय पृथ्वीवरील हवाईच्या पाच व अॅरिझोनातील १ अशा सहाज्वालामुखी खडकांचा अभ्यासही केला आहे.
पृथ्वीवर या ग्रहाने केलेल्या आघाताचा पुरावा हा खडकांच्या रासायनिक रचनेत आहे. त्यानुसार या खडकांमध्ये ऑक्सिजनचे अणू असून खडकांच्या आकारमानाचा नव्वद टक्के भागऑक्सिजन अणूंचा आहे, तर ५० टक्के भाग वजनाचा आहे. पृथ्वीवरील ९९.९ टक्के ऑक्सिजन हा ओ-१६असून त्याच्या प्रत्येक अणूत ८ प्रोटॉन व ८ न्यूटड्ढॉन आहेत. असे असले तरी त्यात ओ १७ व ओ १८ यासमस्थानिकांचा समावेश आहे. त्यांच्यात एक व दोन न्यूटड्ढॉन जास्त आहेत. पृथ्वी, मंगळ व इतर ग्रहयांच्यात ओ १७, ओ १६ यांचे विशिष्ट प्रमाण आहे. पण ते वेगळे आहे. पृथ्वी व चंद्रांच्या ऑक्सिजनसमस्थानिकात फरक दिसून आलेला नाही, त्यामुळे चंद्र व पृथ्वी यांच्यात फरक दिसत नाही, असेकॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक एडवर्ड यंग यांनी सांगितले.पृथ्वी व थिया एकमेकांवर आपटले असतेतर म्हणजेच पृथ्वी थियाला चाटून गेली असती तर चंद्राचा बराच भाग थियावरील द्रव्यांचा बनलेला दिसूनआला असता व चंद्रावर ऑक्सिजनची वेगळी समस्थानिके दिसली असती. पण त्यांची समोरासमोर टक्करझाली आहे. कारण पृथ्वी व चंद्र यांच्या रासायनिक रचनेत साम्य आहे. थियावरील द्रव्य हे पृथ्वी व चंद्रयांच्यात सारखेच वाटले गेले व त्यामुळे थियाच्या चंद्रावरील खुणा व पृथ्वीवरील खुणा यात फरक नाही. आघात झाला नसता तर थिया हा बालग्रह वाचला असता व तो नंतर मोठा ग्रह बनला असता. या ग्रहाच्याआघाताने पृथ्वीवरचा पाण्याचा साठा कमी झाला की नाही, असा एक प्रश्न आहे त्यावर वैज्ञानिकांचेम्हणणे असे की, या आघातानंतर लाखो वर्षांनी काही लघुग्रह पृथ्वीवर आदळले त्यात पाणी होते. त्यामुळे पृथ्वीवरचे पाणी वाढले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा